बुधवार, १८ जुलै, २०१२

रीत

संध्याकाळी ताजे
गुलाब घ्यावे म्हणतो.
तिच्या कुरळ बटांना
हळुच सजवावे म्हणतो
.
छोट्यासाठी लुडो
घेऊनच आलो आज
देईन आणि बघेन
त्याचा हर्षित नाच
.
धडाम वाजले काय
जाणवत नाही पाय.
आई, बाबा, माझी मनू
जन्म आठवला जणू
.
लोकल झाली माती
कितेक स्वप्ने मिटली.
हे जीवन संपवण्याची
तुझी रीत रे कुठली?
.
तुषार जोशी, नागपूर
२८ नोव्हेंबर २००७
+९१ ९८२२२ २०३६५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: