रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

घाई

मी बोललो
भरभरून माझ्या मनातले
ते तुझ्या अनुभवाच्या चष्म्यातून
तुझ्यापर्यंत पोचले

मी सांगितले
खडानखडा काहीही न सोडता
तुझ्या मनाने तुला हवे तेवढेच
त्यातून नकळत वेचले

मी आनंदलो
तुला सर्व सांगून
मोकळे झाल्या मुळे
तू ही आनंदलास
तुला सर्व काही मिळाले आहे
असेच वाटल्यामुळे

दोघांच्या संवादात
काहीतरी सुटून गेले बिचारे
निघूनही हवे तसे जे
पोहोचूच शकले नाही
नेहमीच असे होत असणार कारण
मला सांगायची घाई
तुला ऐकायची घाई

~ तुष्की
नागपूर, १७ फेब्रुवारी २०१३, १७:३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: