गुरुवार, ८ जानेवारी, २००९

प्रतिभेचा स्वामी

.
कविता झाली की आपण
परतुन देही येतो
शब्दाशब्दातून तो
अस्तित्व जाणवुन देतो
.
कौतुकाने वाचतो
आपण लिहिलेली कविता
दाद निघते सहज
त्या लिहिणा~या करता
.
किती कलंदर आहे
कविते पुरता येतो
तो प्रतिभेचा स्वामी
कविता करवून घेतो
.
तुषार जोशी, नागपूर
.

1 टिप्पणी:

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: