शुक्रवार, २१ जून, २०१३

सावली

कधी सांजवेळी मनाच्या तळाशी
निनावी क्षणांचे धुके दाटते
तुझ्या आठवांच्या मीठीतून घ्यावी
पुन्हा ऊब थोडी असे वाटते

लपेटून घेता तुझ्या आठवांना
उमेदून येते पुन्हा पालवी
उफाळून येते मनातून प्रीती
उरी जागवे नित्य आशा नवी

कधी खिन्न होतो जगाच्या उन्हाने
तुझे भास आयुष्य देती मला
तुझे शब्द येती क्षणांच्या रूपाने
जगावे कसे हेच सांगायला

तुझ्या सावलीचे कवच दाट आहे
जगाची उन्हे बाधती ना मला
तुला आठवोनी पुन्हा सिद्ध होतो
अनेकांप्रती सावली व्हायला

~ तुष्की
नागपूर, २२ जून २०१३, ११:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: