अंधार वाढेल
दिशांना व्यापेल
भासेल चहूकडे
काहीच दिसत नाही
वाटत असले तरीही
पणती - आशेची तेवत ठेवा
प्रयत्न थकतील
अंदाज चुकतील
हवे तसे ना घडे
सर्व उपाय संपलेत
वाटत असले तरीही
पणती - जिद्दीची तेवत ठेवा
एकटे वाटेल
शांतता जाचेल
डोळ्यात साचे रडे
आपले नाहीच कुणी
वाटत असले तरीही
पणती - प्रीतीची तेवत ठेवा
~ तुष्की
नागपूर, ५ मे २०१३, १२:००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: