मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

चिखल

राजकारणाचा
चिखल हा झाला
भ्रष्टाचार सारा
अन्याय माजला

जपावे कसे हो
मनाचे कमळ
टिकावे कसे हो
विचार निर्मळ

संताप संताप
जिवाचा वाढतो
उपाय सुचेना
वैताग जाळतो

राज्य कारभार
प्रणाली नासली
जनमानसात
लाचारी साचली

त्रासुन तरूण
विदेशी पळती
थांबवावी कशी
ज्ञानाची गळती

समाजाने आता
पेटून उठावे
अंधकारमय
ग्रहण फिटावे

विचार क्रांतीचा
पाऊस पडावा
चिखल सगळा
धुवून निघावा

~ तुष्की
नागपूर
१६ आक्टिबर २०१२, १२:४०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: