शुक्रवार, १५ जून, २०१२

खपली - २

तू म्हणालास फोनवर
आता भागत नाही
फक्त एकदा भेट
मी जास्त मागत नाही

भेटल्यावर म्हणालास
एकदाच हात धरू?
मलाही आधार हवाच होता
कीती स्वतःला आवरू.

शब्दात मांडता येत नाही
सगळे तिथेच बघ अडते
म्हटलास ओठांची भाषा
आरक्त ओठांनाच कळते

तुझ्यावर विश्वास ठेवला
सगळे तुझेच ऐकले
खूप संयम पाळला मी
पण शेवटी तुला हरले

किती मोहरले मनात
किती स्वप्नात रंगले
जीव तुझा माझा एक
असेच गृहित धरले

त्या दिवसानंतर तू
मला सतत टाळत गेलास
फुसके काही कारण देऊन
सहज मोकळा झालास

माझा विश्वासच बसेना
चालेचना माझं डोक
कसे काम संपले की
चालू लागतात लोकं

वेळ जाईल  जखमेवर
काळाचेही औषध होईल
वरून जखम भरेल पण
खपली तर राहूनच जाईल

तुषार जोशी, नागपूर
१५ जून २०१२, ००:४०
+९१ ९८२२२ २०३६५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: