मनास आवरू किती? सतावते कधी कधी
न ऐकते, हवे तसेच वागते कधी कधी
कळे न नेहमी तिथे कशी पहाट होतसे
नशीब आमचे इथे उजाडते कधी कधी
तिच्या घरा समोर मी पडीक नित्य राहतो
कळे लपून ती हळूच पाहते कधी कधी
नको करूस फोन तू नको निरोप पाठवू
तहान मिस्ड कॉलनेच भागते कधी कधी
जपून 'तुष्कि' शब्द तोल बोल काळजातले
तुझी गझल बघून आग लागते कधी कधी
~ तुष्की
नागपूर
०९ जून २०१२, २०:००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: