बुधवार, ८ मे, २०१३

वाट

किती वेडापासून तुझी
वाट पाऊन र्‍हायलो मी
लोकं पाहायला लागले आता
येडा दिसून र्‍हायलो मी

चिड चिड चिडून माह्या
डोस्क्याचा होईल गोटा
तू येशील अन म्हनशील
रूमाल सापडत नव्हता

तुझ्यावर वैताग करावा
अशी आधी ईच्छा होईल
पण सावळा गोड चेहरा पाहून
सगळे विसरून जाईल

~ तुष्की
नागपूर, ८ मे २०१३, १०:००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: