ममता ताईंनी एक ओळ म्हटली, 'काही नाही.. आठवण आली इतकंच.!..' मग काही राहवलंच नाही इतकंच.!..
काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..
डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..
तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..
आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..
वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..
~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५
काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..
डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..
तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..
आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..
वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..
~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५
अभिप्राय या कवितेला मी देऊ कैसा?
उत्तर द्याहटवाआवडली मला मनापासून... इतकंच
dhanyavaad Prashant
हटवाEvery time I read you poem/s, I end up wondering ... how can you write such wonderful poems on any word/topic ... Keep up ...
उत्तर द्याहटवा