मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

इतकच

ममता ताईंनी एक ओळ म्हटली, 'काही नाही.. आठवण आली इतकंच.!..'  मग काही राहवलंच नाही इतकंच.!..

काही नाही.. आठवण आली इतकंच.!..
काळजातली शिवण निघाली इतकंच.!..

डोळ्यांमध्ये कचरा गेला सांगितले ना
तिच्या सहीची वही मिळाली इतकंच.!..

तुझ्या विना हे जगणे आता शक्यच नाही
जातांना ती मला म्हणाली इतकंच.!..

आठवणींना माझी कधीच हरकत नव्हती
गालावरती येते लाली इतकंच.!..

वाट पाहणे जीव जाळणे संपत नाही
पाहता पाहता वर्षे गेली इतकंच.!..

~ तुष्की
नागपूर, ११ डिसेंबर २०१२, ०१:१५

३ टिप्पण्या:

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: