मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या सार्‍या कविता

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सार्‍या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

मी किती लपविले सांगू संदर्भ तुझ्या प्रीतीचे
बडबडल्या सगळे साल्या माझ्या त्या सार्‍या कविता

कोणाचे कुणीच नसते वाटले मनाला जेव्हा
आम्ही आहोत म्ह्णाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

आयुष्याच्या रूंदीची  चर्चा चालवली त्यांनी
पाठवल्या मीटरवाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

जगताना जळलो इतके स्वप्नांचीच झाली राख
त्या राखेतून उडाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

तुषार जोशी, नागपूर
२१ ऑगस्ट २०१२, १४:००
+९१ ९८२२२ २०३६५

1 टिप्पणी:

  1. मी किती लपविले सांगू संदर्भ तुझ्या प्रीतीचे
    बडबडल्या सगळे साल्या माझ्या त्या सार्‍या कविता

    कोणाचे कुणीच नसते वाटले मनाला जेव्हा
    आम्ही आहोत म्ह्णाल्या माझ्या त्या सार्‍या कविता

    खूपच सुंदर अन् सत्य ही ।

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: